खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढा,नदीवरील पूल पाण्याखाली गेले असून शाळेत जाण्यासाठी पालकांना मुलांना उचलून नेऊन पूल पार करावा लागत आहे.
मुसळधार पावसाने ओढे,नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत.शाळेत परीक्षा सुरू असल्याने मुलांना शाळा चुकवता येत नाही.
यासाठी पालक धाडस करून जीव धोक्यात घालून पाणी वाहत असलेल्या पुलावरून चालत जावून दुसऱ्या बाजूला मुलाला शाळेला जाण्यासाठी सोडत आहेत.काही ठिकाणी मुलेच जीवावर उदार होऊन पाणी वाहत असलेल्या पुलावरून शाळेला जात आहेत.सातनाळी, माछाळी, मांजरप्पी रस्त्यावरील पूल मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. या पुलावरून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
इतकेच नाही तर शालेय विद्यार्थ्यांना हातातून उचलून घेऊन पालकांना पूल पार करून देण्याची वेळ आली आहे. खानापूर – लोंढा मार्गाला जोडणाऱ्या या पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात या पुलावरून प्रवास करणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे आहे.