कर्नाटक राज्य ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी CITU कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा पंचायतीवर मोर्चा काढला.राणी कित्तुर चन्नमा चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला.मोर्चात बेळगाव जिल्ह्यातून आलेले शेकडो कामगार हातात लाल बावटा घेऊन सहभागी झाले होते.मोर्चातील कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचे कर्मचारी म्हणून सगळ्या सुविधा मिळाव्यात.किमान ३१००० रू प्रत्येक महिन्याला वेतन देण्यात यावे.ऑक्टोबर २०१७ अगोदर पासून सेवेत असलेल्या ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी.सेवा बजावताना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरीत घेण्यात यावे.निवृत्त झालेल्या किंवा मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना,कुटुंबीयांना महिना सहा हजार रुपये पेन्शन द्यावी.
दहा वर्षांहून अधिक काळ अनेक ग्राम पंचायतीत व्हॉल्व मन,सफाई कामगार, डाटा एंट्री ऑपरेटर,सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावत आहेत.त्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी.ग्राम पंचायतीत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदलीची मुभा द्यावी अशा मागण्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले.